२८ मे २०२०
_“देशातील कायदा व न्यायव्यवस्था मोजक्या श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या बाजूने”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी आपल्या निवृत्तीच्या भाषणामध्ये म्हटले, ते काय चुकीचे आहे?_
राज्यघटनेच्या ३२ कलमान्वये सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही कायद्याने अगर आज्ञेने कोणत्याही नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आक्रमण झाल्यास तो नागरिक सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतो. घटनेतील मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आवश्यकतेनुसार बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus),परमादेश (Mandamus), प्रतिबंध (Prohobition), अधिकार पृच्छा (Quo Warrant), उत्प्रेक्षण (Certiorari)चे (Writs) आदेश देऊ शकते, परंतु आजची न्यायव्यवस्था तर सरकारपुढे शरणागत झाल्याचेच दिसत आहे.*
आज न्यायमूर्ती शरद बोबडे हे देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. पण आज सर्वोच्च न्यायालयाची प्राथमिकता जर पाहिली, तर न्यायव्यवस्थेचे नेमके कर्तव्य तरी काय? हाच प्रश्न पडणार. देशभरातील स्थलांतरित कामगार तसेच अन्य शहरांत अडकलेल्यांना घरी पोहोचवण्यासंदर्भातील १७ एप्रिल रोजी दाखल केलेली एक जनहित याचिका न्यायालयाच्या यादीत येण्यास २७ एप्रिल उजाडतो. त्यानंतर महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे रेल्वेखाली १६ स्थलांतरित श्रमिक ठार झाल्यानंतर आणखी एक जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. यावर आपले मत व्यक्त करताना, "जर कोणी रेल्वे रुळावर झोपत असेल तर त्यांना आम्ही कसे थांबवू"? असा असंवेनशील प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालय ही याचिका फेटाळून लावते. याऊलट रिपब्लिक टीव्हीचा अँकर अर्णब गोस्वामी याने महाराष्ट्रातील पालघर हत्याकांडावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत झालेल्या अनेक फिर्यादींपासून संरक्षण मागण्यासाठी रात्री आठनंतर दाखल केलेली याचिका मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच या यादीत येते. यामागील गूढ व विरोधाभास आकलनापलीकडील आहे.
राष्ट्रव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली (२४ मार्च) त्यापूर्वीच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी परिपत्रक काढून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होईल असे जाहीर करून न्यायालयांचे कामकाज बंदच करण्यात आले. परंतु स्थलांतरित कामगारांबाबतच्या याचिका सुनावणीसाठी आल्या तेव्हा त्यांच्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली १.७० लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज दिल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने सादर केले. मात्र, यातील अनेक योजनांमध्ये स्थलांतरित मजुरांच्या गरजांचा विचारच झालेला नाही. स्थलांतरितांकडे अधिवासाधारित रेशन कार्डे नसल्याने त्यांना अन्नधान्य मिळू शकले नाही. अडकलेल्या कामगारांना रोजंदारी द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका ३१ मार्च रोजी दाखल झाली होती. या याचिकेच्या पहिल्या सुनावणीदरम्यान (३ एप्रिल) न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले. ७ एप्रिल रोजी झालेल्या पुढील सुनावणीत असे लक्षात आले की, सरकारने तयार केलेल्या स्थिती अहवालाची प्रत न्यायालयाकडे आहे पण याचिकाकर्त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे २० एप्रिल ही पुढील तारीख देण्यात आली. स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर असल्याने लगेचची तारीख देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली गेली. २० तारखेला कोर्ट बसलेच नाही. २१ एप्रिल रोजी एका नवीन पीठापुढे याचिका सुनावणीसाठी आली आणि या पीठाने सरकारनेच यावर उपाय करावा, असे सांगून ती रद्द केली. अशा रितीने *सर्वोच्च न्यायालयाने कोविड-१९ची परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार व त्यांच्या धोरणांवर पूर्णपणे 'अंध'विश्वास टाकला आहे.* मनरेगाखाली १२ कोटी कुटुंबांची नोंद आहे. मात्र, त्यातील केवळ १.५ कोटी कामगार लॉकडाउन झाला त्यावेळी प्रत्यक्ष कामावर होते. बाकीच्यांच्या वेतनासंदर्भात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत, वर्ष संपण्यास बराच अवधी असून हे कामगार नंतर १०० दिवस काम करू शकतात, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण असेच सोडून दिले. मनरेगा कायद्यानुसार या योजनेखाली नोंद झालेली कुटुंबे केव्हाही, अगदी राष्ट्रीय आपत्तीच्या कालावधीतही, कामाची मागणी करू शकतात. सध्या शेतीकामे बंद झाल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याची दखल न घेता लॉकडाउन उठल्यानंतर दोन आठवड्यांनी सुनावणीसाठी तारीख दिली. हा काय प्रकार आहे? मग *राज्यघटनेच्या ३२ कलमाची अंमलबजावणीच होत नसेल, तर मग “देशातील कायदा व न्यायव्यवस्था मोजक्या श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या बाजूने”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी आपल्या निवृत्तीच्या भाषणामध्ये म्हटले, ते काय चुकीचे आहे?
दरम्यान, ११ जानेवारी, २०१८ रोजी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी आश्चर्यकारक घटना घडली होती, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन "All is not okay, democracy at stake" असे जाहीरपणे सांगितले होते. ते आज अगदी तंतोतंत लागू होते, कारण देशात सध्या जे घडत आहे, तो न्याय आहे का? हेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी स्पष्ट करावे.
मो.: ९१६८६०५४४३ , ९०९६४९४८९४
इमेल: loknathkalmegh@gmail.com
"अॉल इज नॉट ओके, डेमॉक्रसी ॲट स्टेक"
(लेखक : लोकनाथ काळमेघ)
_“देशातील कायदा व न्यायव्यवस्था मोजक्या श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या बाजूने”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी आपल्या निवृत्तीच्या भाषणामध्ये म्हटले, ते काय चुकीचे आहे?_
राज्यघटनेच्या ३२ कलमान्वये सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही कायद्याने अगर आज्ञेने कोणत्याही नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आक्रमण झाल्यास तो नागरिक सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतो. घटनेतील मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आवश्यकतेनुसार बंदी प्रत्यक्षीकरण (Habeas Corpus),परमादेश (Mandamus), प्रतिबंध (Prohobition), अधिकार पृच्छा (Quo Warrant), उत्प्रेक्षण (Certiorari)चे (Writs) आदेश देऊ शकते, परंतु आजची न्यायव्यवस्था तर सरकारपुढे शरणागत झाल्याचेच दिसत आहे.*
आज न्यायमूर्ती शरद बोबडे हे देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. पण आज सर्वोच्च न्यायालयाची प्राथमिकता जर पाहिली, तर न्यायव्यवस्थेचे नेमके कर्तव्य तरी काय? हाच प्रश्न पडणार. देशभरातील स्थलांतरित कामगार तसेच अन्य शहरांत अडकलेल्यांना घरी पोहोचवण्यासंदर्भातील १७ एप्रिल रोजी दाखल केलेली एक जनहित याचिका न्यायालयाच्या यादीत येण्यास २७ एप्रिल उजाडतो. त्यानंतर महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे रेल्वेखाली १६ स्थलांतरित श्रमिक ठार झाल्यानंतर आणखी एक जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. यावर आपले मत व्यक्त करताना, "जर कोणी रेल्वे रुळावर झोपत असेल तर त्यांना आम्ही कसे थांबवू"? असा असंवेनशील प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालय ही याचिका फेटाळून लावते. याऊलट रिपब्लिक टीव्हीचा अँकर अर्णब गोस्वामी याने महाराष्ट्रातील पालघर हत्याकांडावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत झालेल्या अनेक फिर्यादींपासून संरक्षण मागण्यासाठी रात्री आठनंतर दाखल केलेली याचिका मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजताच या यादीत येते. यामागील गूढ व विरोधाभास आकलनापलीकडील आहे.
राष्ट्रव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली (२४ मार्च) त्यापूर्वीच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी परिपत्रक काढून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी होईल असे जाहीर करून न्यायालयांचे कामकाज बंदच करण्यात आले. परंतु स्थलांतरित कामगारांबाबतच्या याचिका सुनावणीसाठी आल्या तेव्हा त्यांच्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली १.७० लाख कोटी रु.चे आर्थिक पॅकेज दिल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने सादर केले. मात्र, यातील अनेक योजनांमध्ये स्थलांतरित मजुरांच्या गरजांचा विचारच झालेला नाही. स्थलांतरितांकडे अधिवासाधारित रेशन कार्डे नसल्याने त्यांना अन्नधान्य मिळू शकले नाही. अडकलेल्या कामगारांना रोजंदारी द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका ३१ मार्च रोजी दाखल झाली होती. या याचिकेच्या पहिल्या सुनावणीदरम्यान (३ एप्रिल) न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितले. ७ एप्रिल रोजी झालेल्या पुढील सुनावणीत असे लक्षात आले की, सरकारने तयार केलेल्या स्थिती अहवालाची प्रत न्यायालयाकडे आहे पण याचिकाकर्त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे २० एप्रिल ही पुढील तारीख देण्यात आली. स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर असल्याने लगेचची तारीख देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली गेली. २० तारखेला कोर्ट बसलेच नाही. २१ एप्रिल रोजी एका नवीन पीठापुढे याचिका सुनावणीसाठी आली आणि या पीठाने सरकारनेच यावर उपाय करावा, असे सांगून ती रद्द केली. अशा रितीने *सर्वोच्च न्यायालयाने कोविड-१९ची परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार व त्यांच्या धोरणांवर पूर्णपणे 'अंध'विश्वास टाकला आहे.* मनरेगाखाली १२ कोटी कुटुंबांची नोंद आहे. मात्र, त्यातील केवळ १.५ कोटी कामगार लॉकडाउन झाला त्यावेळी प्रत्यक्ष कामावर होते. बाकीच्यांच्या वेतनासंदर्भात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत, वर्ष संपण्यास बराच अवधी असून हे कामगार नंतर १०० दिवस काम करू शकतात, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण असेच सोडून दिले. मनरेगा कायद्यानुसार या योजनेखाली नोंद झालेली कुटुंबे केव्हाही, अगदी राष्ट्रीय आपत्तीच्या कालावधीतही, कामाची मागणी करू शकतात. सध्या शेतीकामे बंद झाल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याची दखल न घेता लॉकडाउन उठल्यानंतर दोन आठवड्यांनी सुनावणीसाठी तारीख दिली. हा काय प्रकार आहे? मग *राज्यघटनेच्या ३२ कलमाची अंमलबजावणीच होत नसेल, तर मग “देशातील कायदा व न्यायव्यवस्था मोजक्या श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या बाजूने”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी आपल्या निवृत्तीच्या भाषणामध्ये म्हटले, ते काय चुकीचे आहे?
दरम्यान, ११ जानेवारी, २०१८ रोजी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी आश्चर्यकारक घटना घडली होती, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन "All is not okay, democracy at stake" असे जाहीरपणे सांगितले होते. ते आज अगदी तंतोतंत लागू होते, कारण देशात सध्या जे घडत आहे, तो न्याय आहे का? हेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी स्पष्ट करावे.
मो.: ९१६८६०५४४३ , ९०९६४९४८९४
इमेल: loknathkalmegh@gmail.com




