Thursday, 18 June 2020



चीनच्या आधी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मुसक्या आवळा...

🖋️ लोकनाथ काळमेघ

🔴 चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. सर्वप्रथम या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन!
🔴 त्यानंतर २० भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने पुन्हा एकदा भारताला हायड्रोजन बॉम्बची धमकी दिलीय.
🔴 अशातच एक महत्त्वाची बाब आम्ही दुर्लक्षित करता कामा नये. ती म्हणजे कर्नल संतोष बाबू यांचे वडील बी उपेंद्र यांच्याशी 'टाईम्स अॉफ इंडिया'ने बातचीत केली तेव्हा बी उपेंद्र म्हणाले की, जेव्हा संतोष बाबू यांच्याशी फोनवर शेवटचे संभाषण झाले, तेव्हा संतोष सांगत होते, की “तुम्ही भारत चीन सीमेवरील लढाई संघर्षाबद्दलच्या ज्या बातम्या टीव्हीवरुन पाहत आहात, त्या धादांत खोट्या आहेत. ग्राऊंड रिॲलिटी काही औरच आहे.( https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/india-china-border-tensions-parents-were-looking-forward-to-colonel-santosh-babus-posting-in-hyderabad/articleshow/76417207.cms ) याचा अर्थ असा होतो की, ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे २४ तास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपडेट्स जनता ऐकत असते, तीच माध्यमे जनतेची पूर्णतः दिशाभूल करीत आहेत. मीडिया चॅनेल्स सतत सांगत होते की, चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही. जेव्हा की, कुरापतखोर चीन गालवान व्हॅलीमध्ये, फिंगर ४मध्ये, म्हणजेच भारताच्या जमिनीवर तब्बल आठ किमी. आतमध्ये घुसला आहे. हे दुसरे कोणी नव्हे, तर विदेश मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. सदर बातमीत विदेश मंत्रालयाने दिलेली माहिती आहे.( https://www.indiatoday.in/india/story/china-departed-from-consensus-on-respecting-lac-in-galwan-valley-mea-1689644-2020-06-16 )
🔴 भारताचे २० सैनिक ज्या ठिकाणी शहीद झाले, तो परिसर लद्दाखमध्ये आहे. याचेच नाव गालवान घाटी आहे. गालवान घाटी अक्साई क्षेत्रात येते, ज्याबद्दल भारत नेहमी सांगत आला आहे की, अक्साई हा भारताचा भाग आहे.
🔴 'बिझनेस स्टँडर्ड'चा एक नवीन रिपोर्ट सांगतो की, त्याठिकाणची परिस्थिती अजूनही तणावसदृश्य आहे.( https://www.business-standard.com/article/current-affairs/galwan-valley-clash-20-indian-soldiers-killed-in-face-off-with-china-120061700059_1.html ) या रिपोर्टनुसार 'पांगोंग त्सो सेक्टर'मध्ये चिनी सैन्याने फिंगर ४ पर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला असून भारतीय जमिनीच्या ८ किमीपर्यंत ताबा केला आहे, कारण भारत सांगत आला आहे की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा(एलएसी) फिंगर ८पर्यंत आहे. इतकेच नव्हे, तर गॅलवान नदी क्षेत्रातील पीपी १५ आणि पीपी १७ पर्यंतचा परिसरही चीनने ताब्यात घेतला आहे.
🔴 अशी परिस्थिती असतानाही भारतातील दलाल इलेक्ट्रॉनिक मीडिया खोट्या बातम्या प्रसारित करीत आहेत. ही इलेक्ट्रॉनिक माध्यमे कधी सांगतात की चीनचे सैन्य नियंत्रण रेषेवरून माघारले, तर कधी सांगतात की मोदींनी चीनला इशारा दिलाय. चाटुकारितेपुढे वस्तूस्थिती सांगण्याची धमक या चॅनेल्समध्ये नाहीच.
🔴 चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाका, अशा बातम्या दाखवणारी हीच इलेक्ट्रॉनिक माध्यमे होत. पण जरा आपण त्यांच्या बातम्यांखालील जाहिरातींवर नजर टाकली, तर Oppo, Vivo, Skyworth, यांसारख्या कंपन्यांच्या जाहिराती या दलाल इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सवर असतात. आजही आपण यु-ट्यूबवर जाऊन ‘इंडिया टुडे’, ‘झी न्यूज’, ‘आज तक’, ‘टाईम्स नाऊ’, ‘रिपब्लिक टीव्ही’, यांसारख्या अनेक चाटूकार चॅनेल्सवरील जुन्या बातम्या तपासल्या, तर खाली चीनी कंपन्यांच्या जाहिराती असतात.
🔴 अर्नब गोस्वामी, सुधीर चौधरी, अंजना ओम कश्यप, यांसारखे अनेक भामटे अँकर चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या जोरदार डिबेट रंगवतात, तर त्यांच्याच खाली चीनी वस्तूंच्या जाहिरातींनी स्क्रीन रंगलेली असते.
🔴 एकीकडे जेव्हा भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असल्याकारणाने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी देशात जोर धरु लागली आहे. स्वदेशीचा नारा द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने दिल्ली-मेरठ सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉरचे कंत्राट चीनी कंपनीला देत स्वदेशी नाऱ्यावर पाणी ओतलं आहे.
🔴 भारत-चीन सीमेवर तणाव असूनही देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची स्वदेशी चळवळ जोरात सुरू आहे, तरी चिनी कंपन्यांचे वर्चस्व कमी होत नाहीय. 'दिल्ली-मेरठ सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉ'रचं कंत्राट केंद्र सरकारकडून एका चिनी कंपनीला मिळणार आहे. १ हजार १२६ कोटींचं कंत्राट चीनच्या 'शांघाय टनेल इंजिनियरिंग को. लिमिटेड' या कंपनीला दिलं आहे.
🔴 एकीकडे सरकार चीनी कंपन्या सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे दलाल चाटूकार इलेक्ट्रॉनिक माध्यमे चीनच्याच जाहिरातींवर आपले पोट भरत आहेत.
🔴 देशातले सत्तेशी संबंधित जवळपास ९९% इलेक्ट्रॉनिक माध्यमे सारेच खूपच बरबटलेले असल्याने खोट्या आणि वस्तूस्थितीवर आधारित नसलेल्या बातम्या प्रसारित करताना दिसत आहेत. जनतेला सांगायला चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि आपल्या चॅनेलवर चीनी कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्याची लबाडी ही माध्यमे करीत आहेत.
🔴 कर्नल संतोष बाबू यांचे वडील बी उपेंद्र यांच्याशी 'टाईम्स अॉफ इंडिया'ने चर्चा केली तेव्हा बी उपेंद्र सांगतात की, संतोष बाबू यांच्याशी फोनवर शेवटचे संभाषण झाले, तेव्हा संतोष सांगत होते, की “तुम्ही भारत चीन सीमेवरील लढाई संघर्षाबद्दलच्या ज्या बातम्या टीव्हीवरुन पाहत आहात, त्या धादांत खोट्या आहेत, त्यावर विश्वास ठेऊ नका, कारण ग्राऊंड रिॲलिटी आमची आम्हालाच माहिती आहे. देशासाठी प्राणाची आहूती दिलेल्या या सच्चा देशभक्ताने शेवटचे वाक्य आपल्या वडिलांजवळ बोलताना संतोष यांनी एकप्रकारे दलाल इलेक्ट्रॉनिक मीडियाचा खोटेपणा आपल्या वडिलांना सांगितला होता. त्यामुळे ही इलेक्ट्रॉनिक माध्यमे बनावट चित्र उभे करून बेताल बातम्या दाखवत असतील, तर प्रथम या चॅनेल्सवर बहिष्कार टाकायला हवा. खऱ्या संकटाचे मूळ ही माध्यमेच आहेत.

No comments:

Post a Comment